जून महिना उजाडला की लक्ष लागते ते पालखी कधी निघणार याकडे. देहूहून संत तुकाराम महाराज आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरला प्रस्थान होते. हा सोहळा व वारी ही वारकऱ्यांसाठी आनंदाचा ठेवा असतो. या वारीचे ‘दर्शन’ व चिंतन डॉ. रामचंद्र देखणे यांनी ‘पालखी’तील विविध लेखांमधून केले आहे.
ज्ञानदेवांच्या ‘ज्ञानेश्वरी’तील पहिली ओवी ‘ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या’ याच्या विवेचनातून या भक्तीच्या आनंदाला सुरुवात होते. श्रद्धा आणि बुद्धीचे महत्त्व, तत्त्ववेत्त्यांनी मांडलेले वैश्विक तत्त्वचिंतन, अभंगवाणीतून व्यक्त झालेली सामाजिक समता व एकात्मता, भक्तांचे सामाजिकीकरण, कैवल्याची अनुभूती, व्यक्त व अव्यक्त उपासना, वैराग्याची मूल्ये, ओंकार आणि अहंकार, विठ्ठ्ल रूपातून संतांना दिसणारी योगमूर्ती, ज्ञानमूर्ती आणि भगवद्मूर्ती याचे वर्णन यात केले आहे. भक्तीबरोबरच श्रम आणि ज्ञानाला असलेले महत्त्व, कर्मातून उभे राहणारे कैवल्य, गीतेते वर्णिलेले स्थितप्रज्ञदर्शन, मानवी मूल्ये सांगणारा भागवत धर्म, प्रेमभक्तीची मांडणी करणारा मानवधर्म, यातून जीवनवादी विवेकदर्शन यातून दाखविले आहे.
पुस्तक : पालखी
लेखक : डॉ. रामचंद्र देखणे
प्रकाशक : विश्वकर्मा प्रकाशन
पाने : १८३
किंमत : २४० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)