Ad will apear here
Next
पालखी
जून महिना उजाडला की लक्ष लागते ते पालखी कधी निघणार याकडे. देहूहून संत तुकाराम महाराज आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरला प्रस्थान होते. हा सोहळा व वारी ही वारकऱ्यांसाठी आनंदाचा ठेवा असतो. या वारीचे ‘दर्शन’ व चिंतन डॉ. रामचंद्र देखणे यांनी ‘पालखी’तील विविध लेखांमधून केले आहे.

ज्ञानदेवांच्या ‘ज्ञानेश्वरी’तील पहिली ओवी ‘ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या’ याच्या विवेचनातून या भक्तीच्या आनंदाला सुरुवात होते. श्रद्धा आणि बुद्धीचे महत्त्व, तत्त्ववेत्त्यांनी मांडलेले वैश्विक तत्त्वचिंतन, अभंगवाणीतून व्यक्त झालेली सामाजिक समता व एकात्मता, भक्तांचे सामाजिकीकरण, कैवल्याची अनुभूती, व्यक्त व अव्यक्त उपासना, वैराग्याची मूल्ये, ओंकार आणि अहंकार, विठ्ठ्ल रूपातून संतांना दिसणारी योगमूर्ती, ज्ञानमूर्ती आणि भगवद्मूर्ती याचे वर्णन यात केले आहे. भक्तीबरोबरच श्रम आणि ज्ञानाला असलेले महत्त्व, कर्मातून उभे राहणारे कैवल्य, गीतेते वर्णिलेले स्थितप्रज्ञदर्शन, मानवी मूल्ये सांगणारा भागवत धर्म, प्रेमभक्तीची मांडणी करणारा मानवधर्म, यातून जीवनवादी विवेकदर्शन यातून दाखविले आहे.
   
पुस्तक : पालखी
लेखक : डॉ. रामचंद्र देखणे
प्रकाशक : विश्‍वकर्मा प्रकाशन
पाने : १८३ 
किंमत : २४० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZUCCC
Similar Posts
या कातरवेळी जन्म मृत्यूदरम्यानच्या जीवनातील सर्व अवस्थांपैकी वृद्धत्व ही काहीशी घाबरवून सोडणारी अवस्था असते; मात्र ती जीवनाची परीपूर्णताही असते, हे लक्षात घेऊन या अवस्थेला सामोरे जाण्याची ताकद प्रत्येकानेच मिळवायला हवी.
हॅलो मी प्रतिमानव शाळा-महाविद्यालयीन पुस्तकांमधील विज्ञान हे आपल्या रोजच्या जीवनचाच भाग असते. सध्याच्या यांत्रिक युगात तर विज्ञानशिवाय पान हालत नाही. यंत्रमानवासारख्या संकल्पना काही वर्षांपूर्वी काल्पनिक वाटत होत्या, त्या आता प्रत्यक्षात आल्या आहेत. यातूनच शरद पुराणिक यांनी विज्ञानरंजक कथा ‘हॅलो मी प्रतिमानव’मध्ये लिहिल्या आहेत
पु. भा. भावे, वा. गो. आपटे, डॉ. छाया महाजन, डॉ. रामचंद्र देखणे नवकथेचे जनक, भाषाप्रभू पु. भा. भावे, ‘शब्दरत्नाकर’कार वा. गो. आपटे, कथाकार डॉ. छाया महाजन आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि प्रवचनकार डॉ. रामचंद्र देखणे यांचा १२ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
आनंदवनाचा विकास कुष्ठरोग्यांची सेवा करण्याच्या ध्येयाने बाबा आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली आणि समाजातील दुर्लक्षित घटकांच्या जीवनात आनंद फुलविला. त्यांचे पुत्र डॉ. विकास आमटे यांनी बाबांचा वसा पुढे नेला. या विकासपुत्राची कहाणी डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘आनंदवनाचा विकास’मधून कथन केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language